Pages

भाषा लिपी






     शैक्षणिक  व तंत्रज्ञानात्मक माहितीने परिपूर्ण असणारा ब्लॉग   
 💁 विद्यार्थी विकास 💁

👉 *सर्व भाषा वाचता येणारी नवी लिपी तयार केली जाणार*



देशात एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी भाषा येणे ही महत्त्वाची बाब असते. एका राज्यातील लोक जेव्हा दुसऱ्या राज्यात जातात तेव्हा भाषेची मोठी अडचण होते. नेमक्या याच समस्येवर आता एक भन्नाट उपाय शोधला जात आहे. भाषा येत नसलेल्या राज्यात गेल्यावर अनेकदा संवाद साधता येत नसल्याने राहण्यापासून ते जेवणापर्यंत अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यावर उपाय म्हणून सर्व भाषा वाचता येणारी एक नवी लिपी तयार केली जात आहे. या लिपीमुळे भारतात कोणत्याही राज्यातील व्यक्तीशी बोलताना तुम्हाला अडथळा येणार नाही.


👉 संपूर्ण भारतात संवाद साधण्यासाठी ही लिपी मदत करेल म्हणून या लिपीला ‘भारती लिपी’ असे नाव देण्यात आले आहे.

👉 भारतातील आयआयटी मद्रासमधील वैज्ञानिकांची टीम ही लिपी तयार करत आहे.

👉 या लिपीद्वारे भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषा वाचता येणार आहेत. तसेच या लिपीच्या विकासामुळे निरनिराळ्या प्रांतांमधील लोकांना परस्परांची भाषा समजणे सोपे होणार आहे.

👉 या लिपीची कल्पना आयआयटीच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाचे प्राध्यापक व्ही.श्रीनिवास चक्रवर्ती यांची आहे. त्यांना 3 वर्षांपुर्वी या लिपीची कल्पना सुचली.

👉 श्रीनिवास यांच्या मते, भारतात भाषा जरी वेगळ्या असल्या तरी त्यामधील प्राथमिक स्वर एकसारखाच असतो. याच स्वरांना एकत्र घेऊन त्यांनी ‘भारती’ निर्माण केली आहे.

👉 भारतीमध्ये प्रत्येक स्वर समुहासाठी एक प्राथमिक अक्षर तयार करण्यात आले आहे. वेगवेगळ्या स्वरांमधील फरक दाखविण्यासाठी प्राथमिक अक्षरांमध्ये थोडेसे बदल करण्यात आले आहेत.

👉 भारती लिपी अतिशय सोपी असल्याने डिस्लेक्सिया असणाऱ्या व्यक्तींनाही ही लिपी वाचण्यास मदत होणार आहे.

👉 या लिपीचा प्रचार आणि प्रसार जास्तीत जास्त व्हावा यासाठी मोबाईल ॲप बनवण्यात येणार आहे.